मनुष्याच्या स्वभावाचा एक छान गुण असा कि तो कोणत्या ना कोणत्या तरी influence खाली सतत विचार करत असतो. Influence कोणताही असेल जसे कि एखाद्या कडून झालेला अपमान किवा एखाद्याने केलेली स्तुती किवा कोणताहि एखादा प्रसंग. Influence जितका जास्त तितका विचार करण्याचा कालावधी सुद्धा जास्त. Influence चा positive effect आपण करून घेतला तर आयुष्य जगण्याचे मूळ उत्तर आपल्याला सापडू शकते. अश्याच Influence खाली असेल कदचित, माझ्या डोक्यात क्षितीज ची कल्पना आली. नंदू हितेश आणि संदीप ह्या मित्रांना घेवून ती सध्या implement करत आहोत. ह्या सर्व influence चा मूळ शोधण्याचा मी प्रयत्न केला आणि साहजिकच मला उत्तर लगेचच मिळाल. माझ्या England Trip ने मला खूप काही दिले. त्यातीलच एक म्हणजे movie Patch Adams. ह्या movie ने मला बरेच काही शिकवलं आणि महत्वाचे म्हणजे मला माझ्या आयुष्यातून काय हवे आहे ह्या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले. असंच निरर्थक, कोणतेही ध्येय न ठेवता आपण सर्वजण आला दिवस पुढे ढकलत जातो. ध्येय या शब्दाचा अर्थ प्रत्येक माणसाच्या स्वभाव प्रमाणे बदलत जाईल कदाचित. दररोज झोपताना तरी आपण हा विचार करतो का कि मला आज काय शिकायला मिळालं? आज मी का म्हणून दुखीः होतो? एवढा दुखीः राहायची गरज होती का? जर नव्हती तर मग उगाचच मी माझ्या आयुष्यातील सुंदर दिवस असाच वाया का घालवला atleat उद्या तरी असे नको व्हायला. आणि जर खरोखरच दुखीः होण्या सारखे काही कारण असेल तर त्या समस्येवर मी काय तोडगा काढला? का नुसतं दुखीः होवून वेळ वाया घालवला. हि अशी उत्तरे शोधली कि मग आपणास पुढच्या वेळेस असाच किंवा दुसरा कसला हि प्रसंग आला तर आपण त्याला धीराने सामोरे जावू शकतो.
सरस्वती आश्रम मध्ये जावून तिथे वेळ घालवणे मला खूप आवडते. तिथली मुलं, वातावरण या सर्वांशी एकंदरीतच माझं नात निर्माण झालाय. तिथे जावून ह्या मुलांचे काय प्रश्न असतील, त्यांचे विश्व कसे आहे? आई वडील ह्या त्यांचा कल्पना काय आहेत? ह्या व अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे आम्ही सध्या मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. हि सर्व मुले एक संवेदनशील असा उत्तम माणूस म्हणून घडावीत हाच एक प्रयास ह्यातून आम्हाला करायचा आहे. ह्या सर्वात कितपत यश येते हे आम्हास पण माहित नाही मात्र प्रयत्नात आम्ही कुठे कमी पडणार नाही.
Software Engineer आणि Google ह्यांचे नातेच वेगळे आहे. असंच एक दिवस google करत असताना अजून एका आश्रमाचे संकेतस्थळ सापडले "स्पर्श बालाग्राम". HIV बाधित मुलांचे हे अनाथालय. हे आश्रम उभे राहण्या मागे पण एक अनन्य साधारण अशी गोष्ट आहे. website वर माहिती वाचली, फोटो बघितले आणि खूप सारे प्रश्न निर्माण झाले. का? का म्हणून? एवढ्या लहान वयात ह्या मुलांचा काय अपराध म्हणून हि अशी जीवघेणी चेष्टा? माझ्या मनातील देवाच्या आसीत्वा बाबत लागलीच शंका उपस्थित झाली. सर्व काही डोके सुन्न करणारे होते. विचार आला कि एक भेट देऊन तरी बघू. पण खरं सांगायचे तर माझे धाडस होत नव्हते. ह्या साठी HIV हे कारण नक्कीच नाही. ती मुले जे दुक्ख भोगत आहेत त्यांच्या ज्या वेदना आहेत त्या मी बघूच शकणार नाही. हे सर्व माझ्या आणि आपण सर्वांच्या कल्पने पलीकडचे आहे. असे का? पुन्हा पुन्हा मीच मलाच निर्रुतर प्रश्न विचारत होतो. डोके फुटायची वेळ आली. मी सरळ website बंद केली आणि एक मग कॉफी घेतली. पळवाट असेल कदाचित. एक मग कॉफी ने मी हे सर्व विचार दूर करू पाहत होतो पण प्रत्यक्षात मात्र हि मुले हे आयुष्य जगत आहेत. अंगावर शहारे येत होते काही केल्या विचार चक्र थांबायला तयार होईना. शेवटी नंदू चा आधार घेतला. नंदू जवळ जेव्हा मोकळा झालो तेव्हा हे सर्व ऐकून तो निर्रुतरीत आणि सुन्न झाला. आम्हास खरच कळत नव्हते कि काय करावे. शेवटी ठरवलेच आम्ही कि जावू एक दिवस जर काही नाही जमलं तर atleast छान सुंदर अश्या गप्पा तर नक्कीच मारू शकतो आपण ह्या मुलांसोबत. पण दुसरे मन ऐकायला तयार नव्हते. संदीप शी बोलणे झाले त्याला पण काय बोलावे हेच सुचत नव्हते. हितेश ऑफिस च्या कामात खूप व्यस्त होता म्हणून त्याला हे सर्व सांगून त्याच्या पुढे अजून नवे प्रश्न आम्हाला उभे करायचे नव्हते. खूप ठरवूनहि आमचे काही केल्या धाडस होत नव्हते.
सरतेशेवटी तो गुरवार होता. Sandy टपरी वर भेटला आणि तिथेच decide केले कि आज संध्याकाळी काही केल्या जायचेच. ऑफिस workload संपवून आम्ही पत्ता शोधत एकदाचे स्पर्श बालग्राम ला पोहचलो. फुल मस्ती करत, गाणी म्हणत आलेलो आम्ही पार्किंग मध्ये आल्यावर एकदम mute झालो. का ते माहित नाही. एक शांत वाऱ्याची लाट आणि बोचरी थंडी घेत आम्ही दारावरची बेल वाजवली. स्पर्श बालग्राम १ bhk flat मध्ये चालवला जातो. घड्याळ बघितले तर ८.३० वाजले होते. तरी देखील अगदी प्रसन्न मुद्रेने सौ. सुजाता ताईनि दार उघडले. आतील दृश्य बघून छान वाटले सर्व मुले पंगत करून जेवायला बसली होती. आणलेले sweets सुजाता ताई कडे देवून आम्ही श्री महेश दादा ह्यांच्या सोबत चर्चा करू लागलो. मला का कोणास ठावूक खूप खूप उदास वाटत होते. कदाचित माझे मन अजूनही हि गोष्ट ऐकायला तयार नव्हते कि हि सर्व मुले HIV ग्रस्त आहेत. संदीप तर एक शब्द देखील बोलायला तयार नव्हता. तो पूर्ण वेळ एक शब्द देखील बोलला नाही. आम्ही दोघे असे गप्प असलेले पाहून शेवटी श्री. महेश ह्यांनीच विषयास हात घातला आणि विचारले कि कसे काय येणे केले आज? महेश दादा सोबत बरीच चर्चा केली. दादा कडून बरीच माहिती मिळाली त्यांना आश्रम चालवताना येणाऱ्या अडचणींची देखील माहिती मिळाली. स्पर्श बालग्राम चा stall देखील असतो हे सुद्धा कळले. मी हळूच एक नजर मुलांकडे टाकली खूप सुंदर आणि निरागस अशी हि मुले आहेत. ह्या मधील काही मुलांचे आई वडील दोघेहि हयात नाही तर काही जणांचे अगदी शेवटच्या stage मध्ये मरणाची वाट बघत यातना भोगत आहेत. अगदी प्रामाणिकपणे वारसा हक्क ईश्वराने ह्या मुलांना दिलाय. सर्व च्या सर्व मुलांना त्यांच्या आई वडिलान कडून ह्या रोगाची लागण झालीये. देवा अगाध तुझी महिमा रे. एकीकडे वारसा हक्क वरून वैर निर्माण करतोस तर एकीकडे ह्या अश्या चिमुरड्यांना हि असली भयानक शिक्षा देतोस. त्यांचा काय अपराध रे? ह्यातील जवळ पास सर्व मुलांना हा आजार काय ते सुद्धा माहित नाही. तर काहीना हे देखील माहित नाही कि आपण ह्या असल्या भयानक आजाराने ग्रस्त आहोत. पण महेश दादा आणि सुजाता ताई त्यांची खूप काळजी घेतात. केवढे मोठे हे काम. मी महेश दादाला विचारले देखील कि तुमचा हे सर्व करण्या मागचा उद्धेश काय? त्यांचे हे उत्तर "मला ह्या मुलांचे जीवन सुंदर बनवायचे आहे आणि त्यांना एक उत्तम नागरिक बनवून स्व बळावर उभे करायचे आहे." Wow मला हे सर्व Dr. Patch च्या उद्दिष्टाशी मिळते जुळते वाटले. सहीच. शेवटी महेश ला सुद्धा ह्या प्रश्नाचे उत्तर मिळालेच कि त्यांना त्यांच्या आयुष्यातून काय हवे आहे. आयुष्य जगताना संवेदना हीन अश्या मनाने किती हि पैसा मिळवला तरी काय फायदा सरते शेवटी तो सरणावर थोडीच जाणार आहे. सर्व काही सोडून आपणच तिथे एकटे पडलेलो असू. हि उत्तम शिकवण मला महेशदादा नि शिकवली.
आयुष्य जगताना सामजिक बांधिलकी ठेवून, मरण शय्ये वर उभ्या असणाऱ्या कोवळ्या जीवांचा विचार करून त्यांच्या साठी सतत झटणाऱ्या त्यांच्या साठीच आपले जीवन अर्पण करणाऱ्या आणि सतत हसतमुख असणाऱ्या माझ्या महेश दादा आणि सुजाता ताईना मानाचा सलाम.
क्षितीज
२३ डिसें २०१२
No comments:
Post a Comment