मनातील आग कधी कशी आणि का पेटेल ते काही सांगता येत नाही. असाच एक विचार बऱ्याच दिवसां पासून मनात सारखा घर करत होता. mail आला होता मला एक दिवस आनंदवन बद्दल. वाचून आदरणीय बाबा आमटे ह्यांच्या बद्दल खूप आदर निर्माण झाला. पण त्याच सोबत अजून एक विचार मनात चालू झाला अनाथ मुलां चे काय विश्व असेल. आपल्या सर्वांच्या कल्पने पलीकडचे हे विश्व आहे. मनात प्रचंड घालमेल चालू झाली. मग असेच google करताना एक आश्रमाची website सापडली नाव होते सरस्वती अनाथ आश्रम. हि site जवळपास १०० वेळा तरी बघितली असेल. त्या वरील फोटो बघून खूप feel झाले. ठरवले मनात कधी तरी भेट देवूच ह्या आश्रमाला पण योग काही येत नव्हता. असाच नंदू सोबत बसलो होतो एक दिवस. बोलता बोलता सहज म्हटले नंदू अरे आज जागतिक मातृदिन आहे रे. आणि इथेच एक अनाथ आश्रम आहे जायचे का ? जिथे विचार जुळतात कुठलेच expectation राहत नाही यालाच मैत्री असा म्हणावे कदाचित. म्हणूच कि काय नंदू ने विचार लगेचच उचलून धरला. तो दिवस अविस्मरणीय होता. फक्त १ तासच घालवला आम्ही तिथे पण तो हि खूप काही गेला देवून आम्हाला. समीकरण एकदम सोपे होते. कोण आहे ह्या मुलांना आपले असे म्हणणारे. एक आश्रम चालक सोडले तर कोणीच नाही. पण आश्रम चालकान वर पण कदाचित काही मर्यादा येत असतीलच ना. मुले खूप छान बोलली आमच्या सोबत. खूप सारे manners त्यांना आहेत. त्या दिवशी आल्या पासून मन शांत बसायला तयारच नव्हते. काही केल्या सैरभैर झालेले माझे मन माझ्याच काबूत का येत नव्हते ते मला देखील कळत नव्हते. सरते शेवटी दिलीच करून वाट मोकळी मी अश्रुना. मनातील भार हलका करण्याचा तो एक उत्तम उपाय आहे. बऱ्याच वेळाने जरा हलके हलके वाटले. सरते शेवटी सर्व काही विसरून जायचे ठरवले आणि जसे जमेल तसे आपण येथे जात राहू असे ठरविले. गेला तो दिवस अन मग परत चालू झाले daily routine. आला एक दिवस माझा वाढदिवस. सर्वजण करतात तसा मी पण celebrate केला. पण अजूनहि काही तरी missing आहे असे वाटत होते. मग सांगितले संदीप ला चल रे जायचे आहे आपल्याला दगडू शेठ ला. हो म्हटला तो पण लगेच. ठरवले जावू आश्रमात परत. आज मुलांसाठी काही तरी गोड खावू घेवून जावू शेवटी कोण आहे ना त्यांना. गेलो मग तिथे आणि मुलांचे ते बोल कानी पडले God bless you. हा आशीर्वाद म्हणावे कि अजून काही. काहीही असोत मला खूप छान आणि हलके हलके वाटले. तिथे मुलांसाठी tutor म्हणून काम करणाऱ्या आदरणीय गायकवाड सर ह्यांच्या सोबत जरा चर्चा केली आश्रम चालवताना काय अडचणी येतात ह्या बद्दल माहिती घेतली. संदीप ला पण आवडली ती जागा. जो तिथे जाईल त्याला हि मुले आपलेसे करून घेतात काय जादू आहे काय माहित. डोक्यात त्याच वेळी विचार पेटला काही तरी वेगळे करायचे आहे. पण कसे ते समजत नव्हते. बसलो होतो एकदा असाच ऑफिस च्या कॅन्टीन मध्ये भूक लागली म्हणून. विचारले मला सहज मित्राने झाली का रे shopping दिवाळी ची? सहज डोळ्यापुढे बालपण उभे राहिले माझ्या. किती केली मी चंगळ,धमाल मस्ती माझ्या लहानपणी. हवे तसले हवे तेवढे फटाके कपडे आणि बरेच काही. मग माझ्या ह्या मुलांना कोण देईल घेवून नवे कपडे ? कोण करेल त्यांच्या साठी हे सर्व काही. कदाचित येईल कोणी तरी घेवून नवीन कपडे. हक्काचे कोणी नाही म्हणून आशा लावून बसण्या खेरीज काय आहे त्यांच्या हातात. मनात घालमेल चालू झाली आणि सहजच ओंकार ला म्हणालो ओंक्या माझ्या डोक्यात एक विचार येत आहे सारखा. हि अशी जी अनाथ मुले असतात त्यांच्या साठी काही तरी करू रे. या दिवाळी ला कपडे घ्यायचे का त्यांना नवीन? मला एकट्याला किवा आपण दोघांना हे शक्य नाही तर मग अजून बाकीच्या मित्रांची मदत घेवू. नंदू ला लगेच एक फोन. साहेब फोन वरूनच एका पायावर तयार. असे सर्व करता करता आम्हाला २१ जण मिळाले जे ह्या कामाला sponsor करतील. आणि सर्व मुलांसाठी कपडे खरेदी झाली सुद्धा. एकदम jhang pang कपडे घेतले सर्वाना. हे सर्व करताना एक वेगळीच प्रेरणा आणि शक्ती बरोबर होती. मनात आग असेल आणि एखाद्या गोष्टी चा ध्यास घेतला कि ती गोष्ट एकदम तडीस पार पडल्या शिवाय चैन पडत नाही. सरते शेवटी कपडे मुलांना दिलेच. joy of giving ज्याला म्हणतात तो आम्ही अनुभवला. मुलांच्या डोळ्यातील आनंद आणि समाधान जे आम्ही अनुभवले त्याला शब्द नाहीत. खूप छान वाटले. ज्या जवळच्या व्यक्तीन सोबत हे share केले त्यांना पण हि कल्पना खूप आवडली.
म्हणूनच ठरवलंय मी, नंदू आणि ओंकार ने कि करायच काहीतरी ह्या मुलांसाठी. त्यांचे विश्व काय आहे हे जाणून घेवून त्यांच्या विश्वातील एक कुटुंब आम्हाला तयार करायचे आहे. जिथे फक्त आणि फक्त प्रेम आणि सहकार्य असेल. म्हणूनच मग एक group तयार करावा म्हणतोय. लवकरच अजून एक दोन नवीन initiative घेवून आम्ही आपल्याकडे येवू. गरज आहे आपल्या मदतीची आम्हास (मदत ह्याचा अर्थ फक्त आर्थिक असा होत नाही) तुमचे प्रेम खूप काही देईल त्यांना. समाजासाठी काही तरी देणे आहे आपले हि एकच भावना आम्ही तिघे बाळगून आहोत. ज्यांना आपले घर असे नाही, ज्यांना ह्या जगात मायेची फार नितांत गरज आहे आणि ज्यांना मन मोकळे करण्यासाठी कोणी नाही ह्या सर्वांसाठी आम्ही आहोत वय, जात, धर्म ह्या आणि अजून कोणत्याही मर्यादे पलीकडे. हो नक्कीच. कधीहि कुठेहि आणि केव्हाहि.
